मंगळवार, ८ जुलै, २०१४

कोथळीगड प्रदक्षिणा

              201४ चा जून महिना संपायला आला तरी आमचा पाऊस हवा तसा चालू झाला नव्हता. परिणामी आमचा मान्सून ट्रेकचा प्लान देखील होत नव्हता. मात्र सह्याद्रीच्या वेड्यांना सह्याद्रीची ओढ ही कायमच लागलेली असते. त्यामुळे लवकरच ट्रेकला जायचा अस आम्हा सर्व मित्रांचं ठरल. सरतेशेवटी खूप मोठ्या चर्चेनंतर २९ जूनला आमचा कोथळीगडचा प्लान नक्की झाला. ठरल्याप्रमाणे मी २९ जूनला सकाळी ५. ५० ला भांडूप स्टेशनला पोहोचलो. तिकडे अविनाश आणि Daniel माझी वाट बघतच होते. मग आम्ही ६. १० ला CST वरून येणारी कर्जत ट्रेन पकडली. आमच्या आणखी तीन मित्रांनी ती ट्रेन अगोदरच घाटकोपरवरून पकडली होती ,पुढे आमचे अजून दोन मित्र कळव्याला चढले आणि सुरुवात झाली आमच्या कोथळीगड ट्रेकची.
              गप्पा टप्प्या नादात आमचा आमचा पुढचा प्रवास सुरु झाला होता खरा  मात्र आमच्या ग्रुप मधील एक निलेश पाटील यांनी ही ट्रेन पकडली नव्हती आणि ते फोनही उचलत नव्हते. त्यामुळे सर्वजण शांत होते. बहुतेक पाटलांचा हा ट्रेक चुकला असे आमच्या सर्वांचे मत झाले.अचानक माझा फोन वाजला आणि अपेक्षेप्रमाणे तो पाटलानचाच होता . "माझी ही ट्रेन चुकली आहे आणि मागून येणारी इंटरसिटी पकडून मी ८. १५ पर्यंत कर्जत ला पोहोचतो "असा पाटलांचा निरोप मिळाला आणि सर्वाना हायसे वाटल. आमचा प्रवास चालूच होता ज़ुने कॉलेजचे मित्र खूप दिवसांनी भेटले कि भूतकाळात गेलेल्या अनेक आठवणीना उजाळा मिळतो आणि मग वेळ कशी निघून जाते हे काळातच नाही.
             हा हा म्हणता सुमारे ७.४० ला आम्ही कर्जतला पोहोचलो. ट्रेन मधून उतरल्यावर आम्हाला  ST डेपोमध्ये जायचे होते. मग एक दोन जणांना आम्ही ST डेपो कुठे आहे असे विचारले. त्यांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही कर्जत पूर्वेला येवून मुख्य रस्तावर मुंबईच्या दिशेने सरळ दहा मिनिटे चालत गेलो आणि आम्हाला ST डेपो भेटला. तिकडे आमच्यासारखे अजून काही ट्रेकर्स आले होते. तिकडून आम्हाला आंबिवलीला पोहोचायाचे होते. पुढे चौकशी केल्यावर असे कळले कि समोर उभी असलेली ST आंबिवलीला जाणार असून ८.३० वाजता सुटणार आहे. मग आम्ही धावतच ST मध्ये चढलो आणि सर्वजणांनी जागा पकडली. ST सुटायला अजूनही सुमारे अर्धा तास होता. आता अर्धा तास करायचं काय ह्या विचारात आम्ही सर्वजण ST मधून उतरलो. कर्जत डेपोच्या गेट वर एक वडापाववाला होता. मग काय आमच्या मधील सर्वजण वडापाववर तुटून पडले.एका हातात गरमागरम वडापाव आणि  दुसऱ्या हातात  कडकडीत चहाचा पेला असा दुग्धशर्करा योग जुळून आला होता. प्रत्येकाने २-२ वडापाव रीचावाल्यानंतरच तृप्तीचा ढेकर दिला. एव्हाना सव्वा आठ वाजले होते. मागून आलेल्या कर्जत ट्रेन मधून अजून काही ट्रेकर्स कोथळीगडला जाण्यासाठी येत होते . मग आम्हीपण STमध्ये जाऊन बसलो. अजूनही आमचे पाटीलसाहेब पोहोचले नव्हते. मग आम्ही पाटीलना फोन केला, त्यांनी आता मी कर्जत स्टेशनाला आहे आणि १० मिनिटात पोहोचतो अस सांगितला आणि सुमारे १० मिनिटात पाटील पोहोचले.एव्हाना बस पूर्ण भरली होती. पुढच्या काही क्षणात बस आणि आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. अधून मधून चढणाऱ्या माणसामुळे बस खचाखच भरली होती. एकमेकांची मस्करी करत आमचा प्रवास चालू होता. सुमारे एक तासात ९.४० ला आम्ही आंबिवलीला पोहोचलो.
       आंबिवलीला आम्ही उतरलो,पाहतो तर काय आमच्या सारखे अनेक ग्रुप तिकडे आले होते. समोरच असलेले हॉटेल संपूर्णपणे भरले होते. मग दुपारच्या जेवणाची सोय एखाद्या दुसऱ्या होते ठिकाणी होते का असा विचार करून आम्ही पुढे निघालो . पुढे एका ठिकाणी आमच्या दुपारच्या जेवणाची सोय झाली. तिकडे आम्ही पुढील रस्त्याची सर्व माहिती विचारून घेतली. आणि आम्ही आमची आगेकूच चालू ठेवली .
              सुमारे पाच मिनिटे सरळ चालल्यानंतर एक कच्चा रस्ता लागला. आम्ही तो रस्ता पकडून पुढे चालू लागलो .आता थोडा चढ चालू झाला होत. आम्ही रमत-गमत ,फोटो काढत काढत पुढे चालू लागलो . सुमारे अर्धा तास पुढे गेल्यावर आम्ही आमचा पहिला stop घ्यायचा ठरवला .१५ मिनिटे बसायचा अस ठरला . मग सर्वांनी आपल्या BAGS  खाली  ठेवल्या. डब्यातले सुके खाणे बाहेर काढले आणि सर्वांनी त्यावर यथेछ ताव मारला. इथे पण आम्ही एखाद-दोन फोटो काढायची संधी सोडली नाही. 
     
Photo credits Sudesh Adkar
आता सुमारे १०
.३० वाजले होते. सुर्य चांगलाच वर आला होता. आकाशात ढग असले तरी पावसाने दडी मारली होती. उन मात्र चांगलेच तापले होते.आम्ही मात्र आमचा पुढचा प्रवास असाच चालू ठेवला. गप्पा टप्पा,एकमेकांची मस्करी,मधेच थांबून एखादा फोटो काढ असा आमचा क्रम चालू होता.  सुमारे ११. १५ ला आम्ही डोंगराच्या वरील भागात पोहोचलो आणि आम्हाला प्रथम दर्शन झाले ते कोथळीगडाचे  उंच डोंगरावर असणारा कोथळीगडाचा सुळका फार आकर्षक दिसत होता. तसेच कोथळीगडाच्या पायथ्याशी असलेले पेब गाव व त्यातील घरे टुमदार दिसत होती. तसेच आपल्याला अजून इतके अंतर कापायचे आहे ह्याची आम्हाला जाणीव झाली.
Photo credits Nilesh Patil

               इकडे आम्ही थोडा वेळ थांबलो. डोंगरमाथा आणि पठार असल्याने वाराही छान सुटला होता. इकडेही आम्ही सर्वांनी आपली फोटोग्राफीची हौस भागवू घेतली. सुमारे १० मिनिटे बसल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला. अजूनही आमचा प्रवास पठारावरूनच होत होता. तीव्र चढ अजूनही लागला नव्हता. मात्र ऊन कडक असल्याने थोडा त्रास जाणवत होता. सुमारे २० मिनिटे सरळ चालत गेल्यावर आम्ही कोथलिगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. एव्हाना दुपारचे पावणे बारा वाजले होते आणि आता आकाशातही जास्त ढग नव्हते. परिणामी ऊन चांगलेच लागत होते. मात्र ह्याच वेळी आम्हाला एक लिंबू सरबतवाला भेटला आणि आमच्यातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भर वाळवंटात झरा मिळाला असा आनंद उमटला. प्रत्येकी दोन दोन ग्लास चढवल्यावर सर्वजण तृप्त झाले. पुढे गावात पाण्याच्या बाटल्या घेवून आम्ही पुढे निघालो. आता मात्र पठार संपून तीव्र चढ चालू झाला होता. आजूबाजूला झाडी थोडी दाट होती. आम्ही झाडीतून मार्ग काढत वर चढू लागलो. वरून खाली येणाऱ्या ट्रेकर्सना वाट देत आम्ही आमची चढाई चालूच ठेवली. तीव्र चढ असल्याने धाप चांगलीच लागत होती. अर्ध्यातासाच्या चढाई नंतर आम्हांला किल्लाची ढासळलेळी तटबंदी दिसली.

Photo credits Nilesh Patil

       पुढच्या ५ मिनिटात आम्ही किल्ल्यावरच्या गुहेत पोहोचलो आणि आपल्या BAGS खाली टाकून सरळ जमिनीवर आडवे झालो. सरळ चढ चढून आल्यामुळे सर्वाना प्रचंड धाप लागली होती. काही काळ पडल्यावर अंगात आलेला क्षीण निघून गेलाकिल्ल्यावरील गुहा प्रशस्त असून आतमध्ये देवाच्या मूर्ती आढळतात. तसेच गुहेतील खांब नक्षीदार असून त्यावर कोरीवकाम केलेलं आढळते. आम्ही इकडे काही वेळ थांबलो आणि नंतर  अजून वर सूळक्याच्या माथ्यावर जायला निघालो. 
Photo credits Sudesh Adkar

       आमच्या माहितीप्रमाणे कोथळीगडाच्या सुळक्यावर जाण्यासाठी आतून पायऱ्या आहेत असे आम्हाला माहित होते .मग आम्ही गुहेतून बाहेर पडून डावीकडे गेलो आणि वरती चढलो . मात्र तिकडे गेल्यावर आमच्या लक्षात आला कि तिथून वर जायला रस्ता नाही . मग आम्ही परत खाली उतरलो आणि परत डावीकडे वळून पुढे वरती जायच्या रस्त्याच्या शोधात पुढे जावू लागलो. मात्र आमच्या ह्या निर्णयामुळे पुढे आम्हाला एका थरारक अनुभवला सामोरे जावे लागले . आम्ही पुढे पुढे जात राहिले.तिकडे आम्हाला कोथळीगडावर असलेले पाण्याचे काही टाके दिसले ह्यातील काही टाके भरलेले तर काही पूर्णपणे कोरडे आहेत. पुढे काही टाके पार करताना आम्हाला चांगलीच  कसरत करावी लागली कारण तिकडे अतिशय निमुळता रस्ता होता ज़ेमतेम एक माणूस जाईल एवढीच जागा होता.
Photo credits Sudesh Adkar

      आता मात्र आम्ही कोथळीगडाच्या मागच्या बाजूला पोहोचलो. अजूनही आम्हाला वरती जायचा रस्ता मिळत नव्हता मग आम्ही अजून पुढे निघालो. मात्र इकडे आम्हाला एक थरारक ROCKPATH लागला. इकडून जायला जेमतेम अर्धा पाऊल जायला जागा होती. एका बाजूला असलेल्या खोल दरीकडे पाहून पोटात गोळा येत  होता. आम्ही कापरीचा आधार घेत हळू हळू एका मागोमाग एक असा तो rockpatch पार केला.
Photo credits Sudesh Adkar
      अजूनही वर जायचा रस्ता दिसत नव्हता. आम्ही अजून पुढे चालत राहिले आणि नंतर आमच्या लक्षात आला कि आम्ही परत जिकडून सुरुवात केलेली त्या गुहेच्या बाजूलाच येवून पोहोचलो. ह्या प्रयत्नात आमची कोथळीगडाला एक संपूर्ण प्रदक्षिणा घालून झाली होती. आता मात्र आम्ही २ मिनिटे तिकडेच थांबलो. नीट बघितल्यावर आमच्या असे लक्षात आले की गुहेला लागुनच डावीकडे , वरती जायला पायऱ्या आहेत . मग आम्ही हळू हळू त्या पायऱ्या चढू लागलो. वरती जायला असणाऱ्या पायऱ्या दगडात कोरलेल्या असून प्रत्येक पायरी सुमारे एक एक फुटाची आहे. ह्या पायऱ्या गोलाकार जिन्याप्रमाणे कोथळीगडाच्या आतून वर वर जाण्यारा आहेत. आम्ही एक एक पायरी कापत वरती जावू लागलो,

Photo credits Sudesh Adkar

            पुढे काही ठिकाणी ह्या  पायऱ्या अतिशय निमुळत्या आहेत.एका बाजूला असलेली दरी आणि त्यात निमुळत्या पायऱ्या असा आम्हाला थरारक अनुभव आला. सरते शेवटी आम्ही शिखरावर पोहोचलो आणि आपली कोथळीगडाची  मोहीम फत्ते झाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. वरती मस्त वर सुटला होता तसेच तिकडून भीमाशंकर डोंगररांग ,पदरगड  आणि  तुंगी गावाचा सुंदर नजारा दिसतो आम्ही मग तो सुंदर नजारा जमेल तेवढा डोळ्यात साठवून घेत होतो.
             एव्हाना दुपारचे दोन वाजले होते.आणि आम्हाला कळल्याप्रमाणे आंबिवली वरून कर्जतला जाणारी ST संध्याकाळी सुमारे ५.०० ला असते.आम्हाला ती पकडायची होती तसेच आम्ही आमचे दुपारचे जेवण खाली आंबिवली गावात सांगितले होते त्यामुळे आमचे जेवणही बाकी होते .मग आम्ही लगेचच खाली उतरायचा निर्णय घेतला आणि धावत धावत उतरायला सुरुवात केली सुमारे २० मिनिटात आम्ही पेठ गावात पोहोचलो. आम्ही ठरवले होते कि न थांबता उतरायचे . आम्ही आमचा परतीचा प्रवास असाच चालू ठेवला होता. आता मात्र कडक उन पडले होते . उन्हाच्या झळा चांगल्याच लागत होत्या. आणी त्यातच आमच्या कडील पाणीही संपले होते . त्यामुळे उतरताना आमची चांगलीच वाट लागली होती. सलग दीड तास चालल्यावर सुमारे ३. ३० ला आम्ही खाली आंबिवलीला पोहोचलो . तिकडे आम्ही मग ज्या घरात जेवणाची ORDER दिली होती त्या घरात गेलो. BAGS जमिनीवर टाकून,हाथ पाय धुवून गरमागरम जेवणावर ताव मारला. जेवण केल्यावर काही काळ आराम केल्यावर आम्ही परत निघण्यासाठी ST  थांब्यावर आलो. तिकडे आमच्या सुदेवाने कर्जतला जाणाऱ्या ६ आसनी रिक्षा उभ्या होत्या. मग आम्ही रिक्षा पकडून परत कर्जत कडे निघालो.
             रिक्षात बसल्यावर मनात अनेक विचार तरळत होते . मनात कोथळी गडाची मोहीम सफल झाल्याचं आनंद होताच. त्याच बरोबर डिसेंबर मध्ये कोथळीगडाचा night ट्रेक करायाचं असा विचारही पक्का केला .
ता. क .
१. पावसाळी ट्रेक असला तरी उन्हापासून बचाव करणारी टोपी आणि स्किन नेहमी बरोबर ठेवावी हि महत्वाची गोष्ट आम्हाला कोथळीगडाच्या ट्रेक वरून कळली .
२. कोठलीगड ट्रेकला जेवणाची सोय पायथ्याशी असलेल्या पेठ या गावात होते त्यामुळे खाली आंबिवलीला जेवणाची ओर्देर देण्याची गरज नाही.


४ टिप्पण्या:

  1. Awsome Sudesh mastch mazha ha trek miss zhala pan tuzhya blog mule tohi me purna kela asa vataty....
    Thanks
    Keep writing mitra....
    Next trek la bhetuch

    उत्तर द्याहटवा
  2. Sudesh, you are really amazing...i appreciate your hard work...keep going...i missed this trek but as Pravin said because of your this blog i could manage to go there with you guys. ����

    उत्तर द्याहटवा