शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

रम्य , स्वर्गीय ,गूढ ,थरारक - भीमाशंकर !!!

         २७  जुलेच्या रात्री आम्ही   जण  ऐरोली ब्रिज जवळ जमलो आणि कांजूर वरून येणाऱ्या बसची वाट बघत होतो. आमचा मित्र सुरूवातीलाच  बस मध्ये चढणार होता, तर अजून जण कामोठे पनवेलला चढणार होता. काही वेळ वाट बघितल्यावर आमच्या मित्राचा फोन आला कि बस कांजूर वरून निघाली आहे आणि मग पुढच्या काही वेळातच आमची बस तिकडे पोहोचली . मग आम्ही बस मध्ये चढलो आणि सुरुवात झाली ती आमच्या भीमाशंकराच्या ट्रेकची !!!! काही वेळातच पनवेल जवळ आमचा अजून मित्र बस मध्ये चढला . अश्याच रीतीने - करत सार्वजन बस मध्ये चढले आणि बस फुल भरली मग बस थांबता भीमाशंकऱकडे निघाली .सर्व लाइट बंद झाल्यावर आम्ही बसमध्ये मस्त ताणून दिली                    

       सकाळी "अरे आपण खांडसला पोहोचलो, आता उठा " ह्या आवाजाने डोळे उघडले आणि मग आम्ही डोळे चोळत बस मधून उतरलोपाउस चिरचिर पडत होता त्याच बरोबर हवेत प्रचंड गारवा होता . तिकडे नश्त्याची सोय केली होतीत्या थंडीत गरमागरम उपमा आणि चहाची चव औरच लागत होती . नाश्ता केल्यावर आम्ही आमच्या bags आम्ही बस मधून उतरवल्या. आमचा संपूर्ण ९० जणाचा ग्रुप निघायला तयार  झाला . जग्गू ने आम्हाला योग्य त्या सूचना दिल्या आणि मग सुरुवात झाली ती एका थरारक ट्रेकची .
Photo credits Pritesh Pandya

           आम्ही फोटो काढत काढत पुढे चाललो होतो  कुंद हवेतून पुढे जाताना गारवा  जाणवत होता.सुमारे १५ मिनिटे सरळ रस्त्या वरून चालल्या नंतर आम्हाला एक प्रचंड मोठा ओढा लागला . आमच्यातील अनेक जननी त्यात मनसोक्त भिजून घेतला . ओढाच्या पाण्याचा  वेग प्रचंड होता त्याचे ते रोद्र रूप पाहून मला माझा फोटोग्राफीचा मोह आवरता आला नाही ,मी त्याचे ते रोद्र रूप माझ्या कॅमेरात साठ्वाय्कॅच प्रयत्न केला  मग ओढ्यावर टाकलेल्या एक मोठ्या ओंडक्याचा आधार घेत आम्ही तो ओढ पार केला.
                       आम्ही तो ओढ पार करून पुढे गेलो ,मात्र नंतर अस लक्ष्यात आल कि फोटोग्राफीच्या नादात आम्ही फक्त १०  जणच मागे राहिलो आहोत आणि बाकी सर्व ग्रुप पुढे निघून गेला आहे. आता मात्र आम्ही झपाझप पावले टाकायला सुरुवात केली मनात  फक्त एकाच विचार होता कि काहीही करू पुढे गेलेल्या आपल्या ग्रुपला गाठायचे . आम्ही झपाझप चाललो होतो मात्र पुढील मिनिटातच गोष्ट लक्षात आली कि ग्रुप ला गाठायच्या नादात आपण रस्ता चुकलो आहोत . आता आम्ही तिकडेच थांबलो सर्वांनी निर्णय घेतला कि परत मागे फिरायचे , मग आम्ही मागे फिरलो आमच्या सुदेवाने आमचा सूत्रसंचालक स्वप्नील खिंडारे मागून येतच होता मग त्याने आम्हाला योग्य रस्ता दाखवला , आणि मग आमची आगेकूच सुरु झाली  आता मात्र पठार संपून तीव्र चढण  चालू झाली होती..कुंद हवेतून वर चढताना धाप लागत होतीचढणीचा रस्ता इकडे फारच तीव्र होता . सुमारे २० मिनिटे चढल्या नंतर आम्हाला मोठी शिडी दिसली .  सुमारे ३० फुट लांब असलेली हे शिडी पूर्णपणे कडयाच्या काठावर आहे . शिडीवरून चालताना हे शिडी हलत असते . ह्या शिडीवरून चालून जाताना एक थरारक अनुभव अल. सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही एका वेळेला केवळ जणांनीच हे शिडी पार केली.
Photo Credits Nilesh Patil

                             शिडी पार केल्यावर लगेचच एक  छोटा rock-patch लागतो .patch छोटाच असला तरी वरून येणाऱ्या पाण्यामुळे रस्ता अतिशय निसरडा झाला होता . आणि  एका बाजूला खोल दरी असल्यामुळे आम्ही अतिक्षय काळजीने तो patch  पार केला . पुढे आम्हाला एक छोटी गुहा दिसली . गुहेच्या बाजूलाच वरून कोसळणारा धबधबा देखील होता . आम्ही गुहेमध्ये १०  मिनिटे विश्रांती घेतली . माझ्या काही मित्रांनी इकडे पण धबधब्यात भिजायची संधी सोडली नाही.नंतर मग आम्ही आमची आगेकूच चालूच ठेवली. लगेचच आम्हाला आणखी एक शिडी लागली सुमारे १० फुट उंच अशी हि शिडी जवळपास काटकोनात लावलेली होती . ह्या शिडी वरून आम्ही वर चढून गेलो
Photo credits Pritesh Pandya

                    त्याच्या नंतर लगेचच पुढे लागून  एक rock patch होता . तिकडे लावलेल्या रोप चा आधार घेत आम्ही वर चढलो . रोप असल्यामुळे आम्ही पुढे जावू शकलो . रोप शिवाय हा patch करणे फार धोकादायक आहे. आम्ही मिनिटे पुढे जातो जातो तोच आणखी एक rock patch लागला . हा patch अतिशय तीव्र होता आणि इकडे रोप देखील लावली नव्हती . मग कपारीतील जागांचा आधार घेत आम्ही वर चढलो आणि तो patch पार केला
Photo Credits Nilesh Patil

                   तिकडून थोडे पुढे गेल्यावर आम्हाला अजून एक धबधबा लागला . आणि आम्ही परत त्यात भिजून घेतला. मग आम्ही परत पुढे निघालो . काही वेळातच चढण संपून पठार चालू झाल होत . मग पुढच्या काही वेळातच आम्ही पदरवाडी ह्या गावात पोहोचलो . आता मात्र माही सर्वांनी दहा मिनिटे थांबायचं ठरवला . १० मिनिटातच आमच्या ग्रुप मधले मागे राहिलेले सार्वजन तिकडे पोहोचले . मग आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरु केला .  आता पर्यंत साफ असलेला परिसर आता संपूर्णपणे धुक्याने दाटून आला होता . धुके इतके गडद होते कि दोन हातावर चालणारा माणूस देखील दिसत नव्हता . पुन्हा चालू झालेली चढण चढत -चढत आम्ही आपली आगेकूच चालूच ठेवली. संपूर्णपणे दाटलेले धुके, अतिशय दाट जंगल आणि ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचणे केवळ अशक्य झाले होते . दुपारचे १२ वाजता संध्याकाळचे वाजल्याचा भास होत होता.
Photo Credits Pritesh Pandya

            एकमेकांना मदत करत आम्ही ते जंगल पार केले आणि मग परत एकदा पठार चालू झाले . संपूर्ण पठारावर धुक्याची चादर पसरली होती .कोणत्या दिशेने जायचे हे देखील करत नव्हते . मग पुढे चालणाऱ्या लोकाच्या मागो-माग आम्ही चालू लागलो .पुढच्या १० मिनिटातच आम्ही भीमाशंकर मंदिराच्या जवळच पोहोचलो . आता मात्र मंदिर आणि आमच्या मध्ये केवळ काही पायऱ्याचेच अंतर बाकी होते . मग आम्ही झपाझप पायऱ्या उतरत मंदिराबाहेर पोहोचलो . तिकडे आमचा मित्र सागर मंदिरा बाहेर आराम करत बसला होता. मग आमचे बूट आणि bags तिकडे काढून आम्ही मंदिराकडे निघालो . मंदिराकडे जायला फारशी लांब रांग  नव्हतीपुढच्या १०  मिनिटातच आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला . वातावरण संपूर्णपणे भक्तिमय झाले झाले होते. बाजूला चाललेले मंत्रपठण मंत्रमुग्ध करणारे होते मंदिरात केलेले नक्षीकाम लक्ष वेधून घेत होते. आम्ही दर्शन करून घेतले आणि गाभाऱ्यातील जागेत बसलो . उद्बतीचा सुगंध ,संपूर्णपणे दाटलेले धुके ,चीर-चीर  पडणार पाऊस ह्यामुळे प्रत्यक्ष स्वर्गात बसल्याचा भास होत होता . डोळे बंद करून शिव- शंभुचे नाव घेतले आणि त्याच क्षणी एक एक स्वर्गीय अशी मनशांती मिळाली. आता पर्यंत आलेला क्षीण कुठच्या कुठे पळून गेला होता.
Photo Credits Nilesh Patil

         मंदिराच्या बाहेरच एक मोठी घंटा बसवली आहे . ह्या घंटेबद्दल 'चिमाजी आप्पा पेशवे यांनी वसईहून आणलेली घंटा -१७२९ 'असे लिहिलेले आहे. आम्ही आता तिकडून निघालो . बाजूला प्रसादची दुकाने आहेत . घरातून माफी आणी पुढच्या ट्रेकला परवानगी मिळावी म्हणून तिकडच्या दुकानातून प्रसाद विकत घेतला.  एव्हाना प्रचंड भूक लागली होती. जगदीशने जवळच असलेल्या हॉटेल क्षितिज मध्ये जेवणाची सोय केली होती. शुध्द-शाकाहारी थाळी समोर येताच आम्ही त्यावर तुटून पडलोजेवण घरगुती आणि अतिशय रुचकर होते आमचे जेवण झाले होते मात्र आमच्या ग्रुप मधील काही जनाचे जेवण होणे बाकी असल्याने  आम्ही परिसर फिरायला निघालो . संपूर्णपणे धुक्याने दाटलेल्या परिसरात फिरायला मजा येत होती . जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर आम्ही चहा घेतलाअतिशय थंड वातावरण आणी त्यात गरमागरम कडकडीत चहा बस यार !!!!! अवर्णनीय .
                     एव्हाना सर्वांचे जेवण झाले होते .अर्ध्या ग्रुप ने उतरायला सुरुवात केली होती . मग जग्गू ने आम्हाला देखील निघायची सूचना केली . उतरायचा वेळी आम्ही गणेश घाटाने उतरणार होतो . गणेश घटने उतरताना पदरवाडी पर्यंत येतानाचाच रस्ता पकडावा लागतो . आता आम्ही झपाझप उतरत निघालो होतो. उतरताना आमचा वेग फारच वाढला होता . सुमारे २० मिनिटातच आम्ही पदरवाडीत येवून पोहोचलो .तिकडे सुमारे पाच मिनिटे आम्ही मागून येणाऱ्या सर्वाची वाट  बघितली .  मग सुरुवात केली ती गणेश घाटाने परतीच्या प्रवासाची !गणेश घाटाचा रस्ता सरळ आणी सोपा आहे .ह्या रस्तावर दोन्ही बाजूला घनदाट जंगल असून वातेन आपल्याला अनेक छोटे- छोटे ओढे लागतात . आम्ही आता झपाझप चाल निघालो होतो . मी आणी माझा मित्र राहुल मधेच एखादा ओढा लागला कि तिकडे थांबत असू . कॅमेरा TRI-POD लावून आमची LONG EXPOSURE फोटोग्राफी चालू होती
Sudesh Adkar Photography
      
            आम्ही फोटो घ्यायला थांबलो  की  आमचा ग्रुप पुढे निघून जात असे आणी मग आम्ही धावत धावत जावून त्यांना मागून गाठत असू . असा आमचा क्रम चालू होता. सुमारे दीड तास आम्ही त्या गर्द जंगलातून चालत होतो. नंतर आम्हाला अजून एक प्रचंड मोठा असा धबधबा लागला  इकडेही आमच्यातील काही जणानी  भिजून घेतले .मात्र चार वाजत आले असल्याने जास्त वेळ कोणी पाण्यात थांबला नाही . धबधबा पार करून आम्ही पुढे गेलो . आता मात्र दोन्ही बाजूनी असलेले घनदाट जंगल संपले होते . आता एका बाजूला खोल दरी दिसत होती बाजूच्या डोंगरावरून कोसळणारे शुभ्र पाण्याचे प्रपात आम्हाला दिसत होतो .  मी ते नयनरम्य दृश्य माझ्या कॅमेरात साठवत पुढे चाललो होतो.  सुमारे १० पुढे गेल्यवर आमच्या उजव्या बाजूला आम्हाला प्रचंड असा शिडी घाट दिसला त्यात आम्ही चढून गेलेलो शिडी दिसलीउंचावरून कोसळणाऱ्या  अजस्त्र पप्रतासमोर ती शिडी एखाद्या कस्पटाप्रमाणे भासत होती काही क्षण तर विश्वासच बसत नव्हता कि आपण इकडूनच चढून गेलो . मनात विचार आला कि निसर्गाच्या कुशीत डोंगरमाथ्यावर वसलेल्या शिव-शंभुनेच आम्हा पामरांना हा अक्राळ -विक्राळ  घाट ओलांडण्याचे सामर्थ दिले . निसर्गाचे हे रूप शक्य होईल तितके डोळ्यात आणि कॅमेरात साठवत आम्ही पुढे निघालो .
Sudesh Adkar Photography

                 आम्ही आमचा परतीचा प्रवास चालूच ठेवला . आता परत पठार चालू झाले होतो . आता त्या पठारावरून आम्ही झपाझप चालू लागलो काही वेळ पुढे गेल्यावर आम्हाला आमच्या डाव्या वाजूला उंच असा पदरगड दिसला . उतुंग असा पदरगड काही क्षण दिसे आणि पुढच्या क्षणातच तो धुकाच्या चादरीत शकल जाई . निसर्गाचा हा लपंडाव पाहतच आम्ही  पुढे निघालो . आणि पुढच्या काही वेळातच इतका वेळ बंद असलेला पाउस पुन्हा धो -धो कोसळू लागला . आम्ही मात्र पुढे चालतच होतो . काही वेळाने मात्र आम्हाला रस्ते लागले सरळ समोर पायवाट होती . तर दुसरी पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेली वाट होती . इकडे मात्र आम्ही चांगलेच गोंधळलो सरळ दिसणारी पायवाट पकडावी कि पाण्याने तयार झालेली वाट पकडावी हे काळात नव्हते . काय माहित हे पाण्याची वाट पुढे जावून एखाद्या धबधब्यात संपेल . आता मात्र आम्ही इकडेच थांबायचा निर्णय घेतला आणि मागून येणाऱ्या जग्गू ची वाट बघत बसलो . काही वेळातच जगदीश तिकडे आला आणि त्याने सांगितला कि पाण्याची वाट योग्य आहे. मग आम्ही ती वाट पकडून सरळ उतरायला सुरुवात केली . पुढील काही वेळातच आम्ही खांडसच्या गणेश मंदिरात पोहोचलो .तिकडे मंदिरात देव पुढे मत टेकवला आणि सरळ उतरायला सुरुवात केली . उतरताना दूर आम्हाला आमच्या बसेस दिसल्या आणि मग अंगात वेगळाच जोश चढला . माझ्या बरोबर चाललेल्या राहुलला मी म्हणालो तू येमी पळतो . असा म्हणत मी सरळ पळत सुटलो आणि आमच्या बस जवळच येवून थांबलो  मागे नजर टाकली बघतो तर आक्राळ-विक्राळ शिडी घाट आणि  आम्ही उतरलो तो गणेश घाट दिसत होता मनात विचार आला कि असेल मी नसेन मी मात्र तू असशीलच , मी असलो तर नक्की परत येईन तुझ्या भेटीला !!!!!!

ता. .

भीमाशंकरचा ट्रेक , खास करून शिडी घाटाने  करताना  थोडा कठीण आहे . त्यामुळे तो करताना सर्व माहिती असलेल्या ग्रुप बरोबरच करावा .

. गणेश घाटाने उतरताना रस्ता सोपा असला तरी खूप लांब आहे त्यामुळे उतरताना शक्य असेल तेवढा जास्त वेग कायम ठेवावा .

. उतरताना फार शेवटी लागणाऱ्या दोन रस्त्यापेकी खाली येणारा रस्ता पकडावा , इकडे वाट चुकण्याची शक्यता फारच जास्त आहे त्यामुळे गोंधळून गेल्यास आपला लीडर येण्याची वाट  बघावी , एकट्याने तर ह्या रस्तावरून चुकूनही जावू नये